Breaking News
पुढचं शतकचं नव्हे तर संपूर्ण सहस्त्र हे भारताचे असेल- डॉ. वरदराज बापट
मुंबई : अनंत धनसरे
भारत देश आज ज्याच्यामध्ये लीड करतोय ते म्हणजे यूपीआय, आपलं कॉलेज वेगवेगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देणारे आहे. हे सगळं करण्यामध्ये अख्या जगावर लीड करण्याइतके आपण कसे चांगले होऊ असा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. पुढचं शतकचं नव्हे तर संपूर्ण सहस्र हे भारताचं असेल असे उद्गार आयआयटी मुंबईचे सुप्रसिद्ध प्रा. डॉक्टर वरदराज बापट यांनी काढले. ते चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेचे ना.ग.आचार्य आणि दा.कृ मराठे महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या स्व. श्री शरद भाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात "स्वातंत्र्योत्तर भारताची जडणघडण" या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
आता ए आय चा जमाना आहे डोक्यावरून वजन वहानं वगैरे आता सगळं कमी व्हायला लागलंय, आता सगळं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अशी सर्व काम एआय कडून होतात, आताचा काळ हा खूप अनुकूल आहे. अशी विस्तृतपणे मांडणी करीत ते पुढे बोलताना म्हणाले, आपले कॉलेज सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देणारे आहे, याचा फायदा तुम्ही घ्याल त्या दृष्टीने आपली वाटचाल निश्चित झाली पाहिजे.
असे म्हणत भारतातील विविध क्षेत्रातल्या ऐतिहासिक घटनांचे दाखले देत, ते म्हणाले पुढचं शतकचं नव्हे तर पूर्ण सहस्र हे भारताचं असेल याची कुठेतरी सुरुवात २००० सालापासून झाली आहे, आणि त्यामध्ये सर्वात मोठे योगदान आपल्या सर्वांचेचं असेल असेही ते म्हणाले. गेल्या वर्षापासून जानेवारी महिन्यात स्व. शरद भाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या वर्षी १३ आणि१४ जानेवारी रोजी ही व्याख्यानमाला आयोजित केली होती. हे व्याख्यानमालेचे १२ वे वर्षे होते सदर व्याख्यान मालेचे उद्घाटन तरुण भारत वृत्तपत्राचे स्तंभ लेखक श्री. मल्हार गोखले यांच्या व्याख्यानाने झाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले यांनी व्याख्यानमालेचे प्रस्ताविक केले व्याख्यानमालेसाठी संस्थेचे सचिव रमेश म्हापणकर सहसचिव सुबोध आचार्य गव्हर्निंग कौन्सिल मेंबर उपप्राचार्य शैलेश आचार्य , प्राध्यापिका मृदुला वाघमारे, उपप्राचार्य जयश्री जंगले, "आचार्य एफ एम" न्यूजच्या ॲंकर तेजस्विनी मुंडे तसेच याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेचे चेंबूर व देवनार शाखेचे पुष्पाताई कोल्हे, रविकिरण पराडकर, सानप मॅडम तसेच कलारंग सदस्य ठिपसे सर, जयश्री भिसे, शिक्षक- शिक्षकेत्तर वर्ग, विद्यार्थी, चेंबूर मधील साहित्य सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
रिपोर्टर